ऐश्वर्या राय बच्चन कुटुंबियांपासून कायमची वेगळी? अमिताभ बच्चन यांची पोस्ट, म्हणाले, काही नाती…

जगातील सर्वात मोठे लग्न म्हणून चर्चा होत असलेले अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा राजेशाही थाटामाटात विवाहसोहळा संपन्न झाला. या लग्न सोहळ्याला संपूर्ण बॉलिवूड उपस्थित होते. मात्र बच्चन कुटुंबीय व सून ऐश्वर्या राय यांनी स्वतंत्रपणे प्रवेश केला आणि एकत्र पोजही दिली नाही याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

या लग्नाला अमिताभ बच्चन पत्नी जया, मुलगा अभिषेक बच्चन, नातवंडे, मुलगी व जावई यांच्यासह पोहोचले होते. पण सून ऐश्वर्या राय वा नात आराध्या दोघेही यावेळी त्यांच्याबरोबर नव्हते. काही वेळाने ऐश्वर्या व आराध्या यांनी वेगळी एण्ट्री घेतली आणि त्यांनी कुटुंबाशिवाय मीडियाला पोज दिली.

नंतर काही वेळातच अमिताभ आपल्या कुटुंबासह घरी परतले आणि त्यांनी मध्यरात्री एक पोस्ट लिहिली त्यांनी पोस्ट लिहीत असं म्हटलं की, या काळातही काही लोकांशी संपर्क साधण्याची इच्छा व दृढनिश्चय आहे. बऱ्याच जणांसाठी ही कामावर जाण्याची वेळ असेल पण माझ्यासाठी माझ्या EF म्हणजेच विस्तारित कुटुंबाशी जोडण्याची वेळ आहे.

मी नुकताच एका अप्रतिम अशा शाही लग्नातून परतलो आहे, पण जुने मित्र व हितचिंतक भेटल्यानंतर मी फक्त प्रेम व आपुलकीचा खजिना घेऊन परतलो आहे. खूप प्रेम व आपुलकी मिळाली. त्यांच्या चेहऱ्यावर व दिसण्यात बदल झाला असला तरी, एकत्र असताना आमच्या एकमेकांबद्दलच्या प्रेमात, आपुलकीमध्ये कोणतीही कमी नाही. हे जीवन प्रेम, नाती व आपुलकी जपण्यासाठी आहे, असे पोस्टमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, बच्चन कुटुंब हे बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध कुटुंबांपैकी एक आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्य नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात राहतो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अशा काही गोष्टी सुरू आहेत ज्यामुळे चाहत्यांची निराशा होत आहे. बच्चन कुटुंबात काही ठीक चालले नसल्याचे बोलले जात होते.

एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, ऐश्वर्या बच्चन हाऊसमधून तिच्या आई-वडिलांच्या घरी गेली आहे. मात्र, ऐश्वर्या बच्चन हाऊसमधून आई-वडिलांच्या घरी गेल्याची बातमी कितपत खरी आहे, याबाबत आम्ही काहीही सांगू शकत नाही. असे असताना मात्र यामुळे चाहते चिंतेत आहेत.