Maharashtra Politics : आताची सर्वात मोठी बातमी! शिंदे गट भाजपमध्ये विलीन होणार? आतल्या गोटातील माहिती आली बाहेर

Maharashtra Politics: गेल्या वर्षभरात राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. असे नाही असताना आता देखील मोठी बातमी समोर आली आहे. राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत असतानाच दुसरीकडे शिंदे गटाच्या विलिनीकरणाची भाजपकडून रणनीती आखली जात असल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत माहिती अशी की, शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटातील १६ आमदारांना अपात्र ठरवल्यास भाजपने हा प्लान बी तयार ठेवल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नुकतीच शिवसेनेच्या १६ आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी घेतली आहे. यावेळी ठाकरे आणि शिंदे गटाच्या बाजूने जोरदार युक्तीवाद केला आहे. आता या प्रकरणाचा निकाल लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

हा निकाल १० जानेवारीला देण्यात येणार आहे. मात्र त्याआधीच भाजपने मोठी रणनीती आखल्याची समोर आली आहे. जर शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरवले किंवा शिंदे गटाचे धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात आले तर एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटाचे आमदार हे भाजपमध्ये विलीन होतील.

असा प्लॅन असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे येणाऱ्या काळात अनेक राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता लोकसभा विधानसभा निवडणुका देखील जवळ आल्या आहेत. यामुळे पक्षांनी तयारी सुरू केली आहे.

दरम्यान, मार्चच्या अखेरीस लोकसभा निवडणुकीची घोषणा होईल, असे सांगितले जात आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी किंवा फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत अपात्रतेबाबत निकाल दिला तर शिंदे आणि भाजपची अडचण होऊ शकते.