Haryana : मला एकट्याला सोडून कुठे चालला? मी पण येतोय सोबत…; धाकट्या भावाच्या निधनानंतर १५ मिनिटांत थोरल्यानेही सोडले प्राण

Haryana : असा प्रकार हरियाणाच्या रेवाडी जिल्ह्यातील खांड खोलमधील प्राणपुरा (गोपालपुरा) गावात उघडकीस आला आहे, जिथे लहान भावाच्या मृत्यूनंतर 15 मिनिटांतच मोठ्या भावाचाही वियोगामुळे मृत्यू झाला. दोन्ही भावांच्या एकाचवेळी मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे.

भोलुराम आणि प्रभुदयाल हे दोन भाऊ प्राणपुरा गावात एकत्र राहत होते आणि त्यांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. तिसरा भाऊ बनवारीलाल वेगळा राहत होता. भोलुराम आणि प्रभुदयाल एकमेकांशिवाय जगू शकत नसल्याबद्दल अनेकदा बोलायचे.

74 वर्षीय धाकटा भाऊ प्रभुदयाल हे दीर्घ आजाराने त्रस्त होता आणि याच आजारामुळे त्याचे निधन झाले. मृत्यूची बातमी कळताच 84 वर्षीय भोलुराम याला मोठा धक्का बसला आणि तो मृताशी बोलताना म्हणाला की, भाऊ मला एकटे सोडून कुठे गेला आहेस, मीही येतो तुझ्यासोबत.

असे सांगून तो शांतपणे बसला आणि 15 मिनिटांनी त्याचा मृत्यू झाला. प्रभुदयाल यांचा मुलगा राकेश कुमार यांनी सांगितले की, त्यांचे वडील सीआरपीएफमधून निवृत्त झाले होते आणि त्यांना गंभीर आजाराने ग्रासले होते.

त्यांचे काका भोलुराम यांच्याशी लहानपणापासूनच घट्ट ओढ होते आणि ते एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते. वडिलांच्या निवृत्तीनंतर दोघेही नेहमी एकत्र राहत होते. दोन्ही भावांची चिता एकत्र जाळण्यात आली. दोघांच्याही अंत्यसंस्कारासाठी संपूर्ण गाव जमले होते. यावेळी सर्वांच्या डोळ्यात पाणी आले.