नवविवाहितेची आत्महत्या, माहेरची मंडळी संतप्त, सासर गाठून घर पेटवलं, सासू, सासऱ्यांचा मृत्यू…

उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. येथील प्रयागराजमध्ये नवविवाहितेच्या मृत्यूनंतर एकच खळबळ उडाली. याठिकाणी माहेरच्या लोकांनी मुलीचं सासर गाठून कुटुंबासोबत वाद घातला. हा वाद वाढतच गेला.

तरुणीच्या निधनाने संतापलेल्या तिच्या कुटुंबाने घर पेटवून दिले. यामध्ये या मुलीच्या सासू सासऱ्यांचा मृत्यू झाला. यामुळे मोठी खळबळ उडाली. याबाबत पोलीस तपास करत आहेत. यामुळे तीन जणांचा जीव एकाच दिवशी गेला. या घटनेमुळे मोठा तणाव निर्माण झाला.

याबाबत माहिती अशी की याठिकाणी नवविवाहिता अंशिका केसरवानीचा मृतदेह घरात लटकलेल्या अवस्थेत सापडला. अंशिकाचं लग्न मुठ्ठीगंजच्या अंशूसोबत झाला होता. यामुळे तिचे कुटुंबीय मोठ्या संख्येनं तिच्या सासरी पोहोचले. यामुळे मोठी हाणामारी झाली.

सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी अंशिकाचा छळ केला, तिची हत्या केली, असेही सांगण्यात आले आहे. अंशिकाच्या कुटुंबियांनी सासरच्या लोकांना त्यांच्या घरात कोंडलं आणि घराला आग लावली. यामुळे मोठी पळापळ झाली. आत कोण आहे, याचा तपास देखील सुरू झाला.

यामध्ये तिच्या सासू सासऱ्यांचा मृत्यू झाला. वाद सुरू असतानाच अंशिकाच्या माहेरच्या लोकांनी घर पेटवून दिले. यामध्ये 5 जण वाचले. मात्र दोघांचा मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या पथकानं घटनास्थळ गाठून आग विझवली.

दरम्यान, घटनेनंतर पोलिसांनी मदत करत ५ जणांची सुटका केली. आगीची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळ गाठून आग विझवली. यामुळे काहींचे जीव वाचले.