Raigad News : बंद घरातून आली दुर्गंधी, शेजाऱ्यांनी पोलिसांना बोलावलं अन् समोरील दृष्य बघून सगळेच हादरले…

Raigad News: रायगडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी असलेल्या महाडमध्ये घरात मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. नडगाव हद्दीतील अरुण नगर सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे.

दरम्यान, शेजारच्या लोकांना सायंकाळी सर्वत्र दुर्गंधी का येत आहे, असा प्रश्न निर्माण झाला. दिवाळीच्या सणांमध्ये सर्व शेजारी आणि मयत इसमाचे नातेवाईक घरात नसल्यामुळे लवकर कोणाच्याही लक्षात आले नाही. जयदीप बळीराम येरूनकर असे या मृत व्यक्तीचे नाव आहे.

दरम्यान, जयदीप बळीराम येरूनकर यांचा मृत्यूदेह तीन दिवसापासून त्यांच्या खोलीमध्ये होता. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. जयदीप येरुनकर यांना मधुमेहाचा खूप त्रास होता. यामुळे ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे.

त्यांना चक्कर आली आणि त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. दरम्यान, दिवाळीत जयदीप यांच्या पत्नी त्यांना एकटे सोडून गेल्या असल्यामुळे त्यांचा मधुमेहाचा त्रास वाढला आणि यामध्ये त्यांचा मृत्यू झाला, अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे.

या घटनेचा तपास अतिरिक्त प्रभारी पोलीस अधिकारी सुर्वे आणि पोलीस उपनिरीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अंबर्गे हे करीत आहेत. या घटनेमुळे शेजाऱ्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, जयदीप येरूनकर आणि त्यांची पत्नी यांचे देखील क्षुल्लक कारणावरून वारंवार भांडण होत असत. याबाबत शेजाऱ्यांनी माहिती दिली आहे. महाड एमआयडीसी पोलीस ठाणे येथे या मृत्यूची आकस्मित मृत्यू अशी नोंद करण्यात आली.