अजितदादांना धक्का! निवडून यायचं चॅलेंज दिलेल्या उमेदवाराने दाखवला हिसका

आज देशात लोकसभेचा निकाल जाहीर होत आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पडले. त्यात शरद पवार गटाकडून पुन्हा एकदा अमोल कोल्हे यांना खासदारकीसाठी संधी देण्यात आली. मात्र, अजित पवार गटाला उमेदवार मिळत नव्हता.

असे असताना शिवाजीराव आढळराव पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर अजित पवारांनी अमोल कोल्हे यांना तू निवडून कसा येतो हे बघतोच असे चॅलेंज दिले होते. अमोल कोल्हेंनी देखील अजित पवार यांना जशाच तसं उत्तर देत हे चॅलेंज स्विकारले होते.

आता शिरूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. सातव्या फेरीअखेर अमोल कोल्हे यांना 53949 मतांची आघाडी मिळाली आहे. यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

अजित पवार यांच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांना मोठा झटका मानला जात आहे. अमोल कोल्हे यांनी विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु केल्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला. हे माझ्या एकट्याचं यश नाही, सर्व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा विजय आहे, असे कोल्हे म्हणाले.

लोकसभा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कसा निवडून येतो बघतोच, असा सज्जड दम अजित पवारांनी दिला होता. अमोल कोल्हे यांनी हे आव्हान स्विकारले होते. आता लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हे यांनी विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. यामुळे अजित पवारांना मोठा धक्का मानला जात आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी विजय शिवतारे यांना अशाच पद्धतीने सांगून पाडले होते. यामुळे आता शिरूमध्ये काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या अमोल कोल्हे हे मोठ्या मताने पुढे असून त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.