---Advertisement---

Maratha Reservation:  मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा! मनोज जरांगेच्या सगळ्या मागण्या मान्य, सरकारने घेतला मोठा निर्णय

---Advertisement---

Maratha Reservation:  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आज मोठे यश मिळाले. जालन्यातील आंतरवाली सराटी येथून २० जानेवारीपासून मोर्चा काढला होता. मराठा आरक्षणासंदर्भातील आंदोलक मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या महायुती सरकारने मान्य केल्या असून याबाबत मध्यरात्रीच अध्यादेश काढण्यात आले आहेत.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी साखळी उपोषण सुरू केले होते. त्यानंतर जरांगे यांच्या उपोषणाला राज्यभरातून पाठिंबा मिळाला होता. जरांगे यांच्या उपोषणामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले होते.

मराठा आरक्षणाच्या मागणीवरून महाविकास आघाडी सरकार आणि जरांगे यांच्यात अनेक बैठका झाल्या होत्या. मात्र, या बैठकांमध्ये कोणताही तोडगा निघाला नव्हता. त्यामुळे जरांगे यांनी उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा दिला होता.

मात्र, आज ( २६जानेवारी ) मध्यरात्री महायुती सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात अध्यादेश काढला. मराठा आरक्षणाच्या अध्यादेशावर मंत्री मंगलप्रभात लोढा आणि मंत्री दीपक केसरकर यांनी मनोज जरांगे यांना विश्वास दिला. या विश्वासावर जरांगे यांनी उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

जरांगे म्हणाले, “आमच्या सर्व महत्त्वाच्या मागण्या मान्य झाल्या आहेत. राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अध्यादेश स्वीकारुन मी उपोषण सोडणार आहे.”

आज सकाळी 8 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात होणाऱ्या सभेत मनोज जरांगे उपोषण सोडतील. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित राहणार आहेत. मराठा आरक्षणाच्या अध्यादेशामुळे मराठा समाजात आनंदाचे वातावरण आहे. जरांगे यांनी उपोषण सोडण्याचा निर्णय घेतल्याबद्दल समाजातून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---