खेळ

अश्विनने तिसऱ्या कसोटीतून अचानक माघार का घेतली? आता खर कारण आलं समोर, चाहते चिंतेत…

भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने कौटुंबिक वैद्यकीय कारणामुळे राजकोट येथे सुरू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यातून अचानक माघार घेतली आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी याबाबत माहिती दिली आहे.

अश्विनच्या आईला वैद्यकीय अडचणींचा सामना करावा लागला, यामुळे त्याने माघार घेतली. अश्विनला त्याला राजकोट कसोटी सोडून आईसोबत राहण्यासाठी चेन्नईला जावे लागणार आहे. बीसीसीआयने शुक्रवारी रात्री उशिरा या घडामोडीबाबत अपडेट दिले होते.

या निवेदनात म्हटले आहे की, कौटुंबिक वैद्यकीय आणीबाणीमुळे रविचंद्रन अश्विनने तत्काळ कसोटी संघातून माघार घेतली आहे. या आव्हानात्मक काळात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि संघ अश्विनला पूर्ण पाठिंबा देत आहे.

भारतीय क्रिकेट बोर्डाने अश्विनच्या माघारीचे नेमके कारण सांगितले नाही आणि प्रत्येकाने क्रिकेटपटूच्या गोपनीयतेचा आदर करण्याची विनंती केली. बीसीसीआय चॅम्पियन क्रिकेटर आणि त्याच्या कुटुंबाला मनापासून पाठिंबा देतो. खेळाडू आणि त्यांच्या प्रियजनांचे आरोग्य आणि कल्याण आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

अश्विन आणि त्याचे कुटुंब या आव्हानात्मक काळातून जात असताना त्यांच्या गोपनीयतेचा आदर करण्याची विनंती बोर्ड करते. बोर्ड आणि संघ अश्विनला कोणत्याही प्रकारची मदत करत राहतील आणि आवश्यकतेनुसार मदत करण्यास सदैव तयार आहेत. या संवेदनशील काळात चाहते आणि माध्यमांच्या समजूतदारपणाचे आणि सहानुभूतीचे टीम इंडिया कौतुक करते.

अश्विनने सामन्यानंतर पत्रकार परिषदेत आपल्या कामगिरीबद्दल सांगितले. तिसऱ्या कसोटीच्या उरलेल्या वेळेत भारत १० खेळाडूंसह मैदानात उतरेल. आता कर्णधार रोहितकडे या कसोटीत जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांच्या रूपाने चार विशेषज्ञ गोलंदाजांचा पर्याय आहे.

Related Articles

Back to top button