मुंबईत सख्ख्या भावांवर तलवारीने हल्ला, एकाचा जागीच मृत्यू; धक्कादायक कारण आले समोर

शुल्लक वादावरुन दोन सख्ख्या भावांवर तलवारीने हल्ला झाल्याची घटना मुंबईमध्ये घडली आहे. या घटनेत एका जणाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दुसरा भाऊ हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

या घटनेमुळे संपुर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित घटना ही मुंबईतल्या अनुशक्तीनगरमधल्या ट्रॉम्बे परिसरात घडली आहे. या जीवघेण्या हल्लाची घटना सीसीटीव्हीमध्येही कैद झाली आहे.

सोमवारी रात्री शुल्लक कारणावरुन काही तरुणांमध्ये वाद झाला होता. त्यामध्ये रागाच्या भरात काही तरुणांनी मलिक शेख आणि त्याच्या भावावर जीवघेणा हल्ला केला. त्या दोन्ही भावांवर तरुणांनी तलवारीने वार केले आहे.

या हल्ल्यात एका भावाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या भाऊ गंभीर जखमी झाला आहे. हल्ला केल्यानंतर तरुणांनी तिथून पळ काढला होता. त्यानंतर स्थानिकांनी गंभीर जखमी झालेल्या भावाला लगेचच रुग्णालयात दाखल केले आहे.

पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. पोलिस याचा तपास करत असून सीसीटीव्ही फुटेज त्यांना मिळाले आहे. रात्री उशिरा यासंदर्भात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेत मृत्यू झालेल्या मलिक मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

या घटनेनंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. पोलिस सीसीटीव्ही फुटेजमधून याचा तपास करत आहे. लवकर आरोपींना पकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी म्हटले आहे. क्षुल्लक कारणावरुन हा वाद झाल्याचे म्हटले जात आहे. पण नक्की काय कारण होते हे पोलिस तपासात समोर येईल.