नवरा बायकोचे भांडण अन् मुलांचा दिला बळी, चिमुकले भाऊ बहीण ओरडत राहिले पण 2 मिनिटात सगळं संपलं…

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये आळसुंदे गावात एक भयंकर घटना घडली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. याठिकाणी पती-पत्नीच्या किरकोळ वादातून भयंकर कृत्य घडलं आहे. पत्नीने घातलेल्या वादातून एका व्यक्तीने त्याच्या पोटच्या दोन्ही मुलांना विहिरीत ढकलून दिले आहे.

या घटनेत दोन्ही मुलांचा मृत्यू झाला आहे. ऋतुजा शिरसागर (वय-8) आणि वेदांत क्षीरसागर (वय-4) अशी मृत मुलांची नावे आहेत. याबाबत आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस याबाबत तपास करत आहेत.

याबाबत माहिती अशी की, पती-पत्नीच्या किरकोळ वादातून आरोपी गोकुळ जयराम शिरसागर या बापाने त्याच्या मुलांना विहिरी फेकले. यामध्ये ऋतुजा शिरसागर आणि वेदांत क्षीरसागर या दोन्ही चिमुरड्यांचा मृत्यू झाला. यामुळे ही बातमी वाऱ्यासारखी पसरली.

याबाबत गोकुळ शिरसागर या पित्या विरोधात कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मुलांना फेकून गोकूळने स्वतः गावात राहणाऱ्या एका नातेवाईकाला फोन करून दोन्ही मुलांना विहिरीत फोन करून विहिरीत फेकून दिल्याची माहिती दिली.

नंतर सगळ्यांनी विहिरीकडे धाव घेतली. परंतु खूप उशीर झाला होता. ऋतुजा आणि वेदांतचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. यामुळे घरच्यांना एकच धक्का बसला. याबाबत तपास सुरू आहे.