Hyderabad news : आधी देवाचे दर्शन, मग मुलांना खाऊ घातलं अन् आईने दोन मुलांसह सगळंच संपवलं, कारण ठरलं….

Hyderabad news : आईने आपल्या पोटच्या दोन मुलांना नदीत ढकलुन नंतर स्वतः नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.

पोलिसांनी घटनास्थळ गाठुन तिघांचेही मृतदेह बाहेर काढले. निर्मल जिल्ह्यातील बासर शहरात ही धक्कादायक घटना घडली आहे. घाटाजवळ पोलिसांना शाळेचे दप्तर आणि रिकामे टिफिन बॉक्स सापडले आहेत.

यामध्ये मृत महिला मानसी (वय 27) यांनी प्रथम तिचा मुलगा बालादित्य (8 वर्ष) आणि मुलगी नवश्री (7 वर्ष) यांना नदीत ढकलले. त्यानंतर स्वत:ही उडी मारून आत्महत्या केली. मानसी हिचे महबुबनगर जिल्ह्यातील कोसनी येथील व्यंकटेश्वरसोबत 10 वर्षांपूर्वी लग्न झाले होते.

त्यांना २ मुले झाल्या. व्यंकटेश्वरच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते कुटुंब निजामाबादला स्थलांतरित झाले. येथे ते मानसीचा भाऊ संदीपकडे राहात होते. असे असताना व्यंकटेश्वरचा मृत्यू झाला. मानसीने निजामाबाद येथील एका शॉपिंग मॉलमध्ये काम सुरू केले.

नेहमीप्रमाणे मानसने तिच्या भावाला सांगितले की ती १३ तारखेला शॉपिंग मॉलमध्ये कामासाठी जात आहे. तिने आपल्या मुलांना शाळेतुन घेतलं आणि तिघेही बसने निर्मल जिल्ह्यातील बासर या मंदिरात पोहोचले. ते गोदावरी नदीच्या काठी गेले.

दरम्यान यावेळी मानसीने जेवणाचे डबे उघडले आणि आपल्या मुलांना खाऊ घातलं. तिने तिच्या २ मुलांना गोदावरीत फेकुन दिले. या तिघांना नदीत बुडताना पाहुन काही यात्रेकरुंनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र ते बुडाले होते. आर्थिक परिस्थितीमुळे हा टोकाचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.