गेल्या काही महिन्यांपासून महिलांवर होणाऱ्या अत्याचाऱ्यांच्या अनेक घटना समोर येत आहे. काही घटनांमुळे तर राज्यातच नाही, तर देशभरात खळबळ उडत आहे. अशीच एक घटना आता बुलढाण्यातून समोर आली आहे.
बुलढाण्यातील राजूर घाटामध्ये एका ३५ वर्षीय महिलेवर आठ जणांनी मिळून बलात्कार केला आहे. चाकूचा धाक दाखवत आठ जणांनी मिळून आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला आहे. या प्रकरणामुळे संपुर्ण राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे.
तसेच त्या महिलेकडील ४५ हजार रुपये सुद्धा त्या आरोपींनी लुटले आहे. त्यानंतर ते फरार झाले आहे. पीडित महिला आणि तिच्यासोबत असलेला पुरुष गावी जात होते. त्यावेळी ही भयानक घटना त्यांच्यासोबत घडली आहे.
संबंधित महिला आणि पुरुष दोघे खडकी गावी जात होते. त्यावेळी राजूर घाटात फोटो काढण्यासाठी ते थांबले होते. त्याचवेळी आठ जणांची एक टोळी आली. त्यांनी या दोघांना खुप मारहाण केली. तसेच त्या महिलेला दरीजवळ ओढत नेले आणि तिच्यावर बलात्कार केला.
याप्रकरणी बोराखेडी पोलिसांत आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस याप्रकरणी गुन्हा दाखल करुन घेत नव्हते. त्यामुळे आमदार संजय गायकवाड यांनी तीन तास ठिय्या आंदोलन केले आहे. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
राजूर घाटात निसर्गरम्य वातावरण असते. त्यामुळे अनेक जण याठिकाणी फिरायला येत असतात. पण या भागात गुन्हेागारीचे प्रमाणही खुप जास्त आहे. आधीही याठिकाणी बलात्कार झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पण पोलिस बदनामी पोटी तक्रार दाखल करत नसल्याचे संजय गायकवाड यांनी सांगितले आहे.