Jalgaon News : आजोबांवर अंत्यसंस्कार सुरु असताना नातवानी तडफडुन सोडले प्राण, जळगावमध्ये उडाली खळबळ…

Jalgaon News : जळगावमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी आजोबांचे निधन झाल्‍याने आई वडील अंत्‍ययात्रेस गेले होते. त्यांचा मुलगा सुजित दिगंबर पाटील हा घरी एकटाच होता. त्याच्यावर बिबट्याने हल्ला केला. यामुळे एकच खळबळ उडाली.

तो शेताकडे शौचास गेला असता त्‍याच्‍यावर मागून बिबट्याने हल्‍ला करत ओढत उसाच्‍या शेतात नेले. संध्याकाळी घरी आलेल्या आई– वडीलांनी Jalgaon News शोधाशोध केल्‍यानंतर मोबाईल लोकेशनवरून त्‍याचा आज तपास लागला. घटनेमुळे आई वडिलांनी एकच हंबरडा फोडला.

सुजित याच्‍या आजोबांचे निधन झाल्‍याने आई– वडील हे हतनूर (कन्‍नड) येथे अंत्‍ययात्रेसाठी गेले होते. यावेळी ही घटना घडली आहे. यावेळी सुजित हा घरी एकटाच होता. सुजित हा शौचास गेला असता त्‍याच्‍यावर बिबट्याने मागून हल्‍ला करत उसाच्‍या शेतात फरफटत नेले.

आई वडील घरी आल्यावर मुलाच्‍या मोबाईलवर संपर्क केला असता फोन उचलला नाही. यामुळे त्‍यांनी शोध घेतला. त्यांनी रात्री नऊच्‍या सुमारास पोलिसात जावून तक्रार दिली. यावेळी लोकेशन गावापासून ५०० मीटरच्‍या अंतरावर दाखविले. त्‍या दिशेने शोध घेतला असता उसाच्‍या शेतात मोबाईल व सुजितचा मृतदेह आढळून आला.

यामुळे एकच खळबळ उडाली. वन्‍य प्राण्याने हल्‍ला केल्‍याचे लक्षात आले. वनविभागाच्‍या पथकाने पंचनामा करत बिबट्याने हल्‍ला केल्‍याचा अंदाज वर्तविला आहे. कुटूंबाला या घटनेमुळे मोठा धक्का बसला आहे.