Ratnagiri News : आजाराला कंटाळले, घरात एकटे असताना घेतला टोकाचा निर्णय, कुटुंबाचा एकच आक्रोश..

Ratnagiri News: रत्नागिरी जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी
आजारपणाला कंटाळून आसूदमधील व्यक्तीने जीवन संपवले आहे. मनोज बळीराम जाधव असे या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्यावर उपचार सुरू असतानाच त्याचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला आहे.

या घटनेमुळे आसूद तेलीवाडी येथे राहणाऱ्या जाधव कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मनोज जाधव हा शेतकरी कुटुंबातील विवाहित तरुण होता. तो उत्कृष्ट मेकॅनिकही होता. टेम्पो दुरुस्त करण्यात देखील तो अग्रेसर होता.

दरम्यान, या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याने घरात कोणी नसल्याचे पाहून हे टोकाचे पाऊल उचलले होते. घरातील पत्नी आणि मुले शेतात कामासाठी गेले होते. त्यावेळी घरी कोणी नसताना किटकनाशक औषध प्राशन केले. नंतर घटनेची माहिती मिळताच दापोली रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

नंतर त्याला चिपळूण तालुक्यातील डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात अधिक उपचारांसाठी तात्काळ हलवण्यात आले होते, मात्र उपचार सुरू असताना त्याचे निधन झाले आहे. यामुळे कुटूंबाला एकच धक्का बसला. त्याच्या पश्चात त्याची पत्नी, दोन लहान मुले, भाऊ ,भावजय असा परिवार आहे.

दरम्यान, मनोज बळीराम जाधव हा मदतशील स्वभावाचा म्हणून परिसरात सगळ्यांना परिचित होता. त्याला गेले काही दिवस किडनी स्टोनचा त्रास होऊ लागला होता. याला तो वैतातून गेला होता. यामुळे त्याने हा टोकाचा निर्णय घेतला.

ऐन दिवाळीत जाधव कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जाणत्या वयातच या लहान मुलांच्या वाट्यालाही हे मोठे दुःख आले आहे. या घटनेमुळे आसूद परिसरातूनही हळहळ व्यक्त केली जात आहे.