Mumbai News : अर्ध्याहून अधिक मुंबई रिकामी होणार? 60 टक्के मुंबईकर शहर सोडणार, धक्कादायक प्रकार आलं समोर…

Mumbai News : मुंबई ही अनेकांचे स्वप्न असतं. नोकरीच्या निमित्तानं किंवा इतर अनेक कारणांनी मुंबईकडे अनेकांचेच पाय वळतात. स्वप्ननगरी असेही मुंबईला म्हटले जाते. मुंबईत मोठी लोकसंख्या आहे. पण आता याच शहरातील लोकसंख्या आता मोठ्या फरकानं कमी होऊ शकते.   

आता अनेकांचीच जन्मभूमी असणाऱ्या या मुंबईतून मोठ्या संख्येने नागरिक शहर सोडण्याच्या विचारात असल्याची बाब समोर आली आहे. या शहरातील नागरिकांना अनेक अडचणी आणि समस्यांचा सामना करावा लागत आहे. परिणामी शहरातील दर 10 पैकी  6 नागरिक या शहरातूनच बाहेरच्या ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या विचारात आहेत.

एका सर्व्हेक्षणातून ही बाबत समोर आली आहे. प्रदूषणाची धोकादायक पातळी, त्यामुळं व्यायामावर लागलेला विराम आणि त्याचे शरीरावर, जीनशैलीवर होणारे अनिष्ठ परिणाम या कारणांमुळं नागरिक आता असा विचार करत आहेत. यामुळे लवकरच मुंबई रिकामी होणार आहे.

सर्व्हेक्षणातून समोर आलेल्या आकडेवारीनुसार जवळपास 10 पैकी 9 नागरिकांना वाढत्या प्रदूषणामुळं श्वसनाचा त्रास अशा समस्या सतावू लागल्या आहेत. तसेच दमा डोकं वर काढू लागला असून, या रुग्णांमध्ये साधारण 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

या सगळ्या गोष्टींना केवळ वातावरण कारणीभूत आहे. ज्यामुळं शहरातील नागरिकांनी दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होण्याचा विचार करण्यास सुरुवात केली आहे. अनेकांना आसरा देणाऱ्या या शहरातील वाढती गर्दी, सुविधांवर येणारा ताण आणि त्यामुळं निर्माण होणाऱ्या अडचणी या कारणांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. 

दरम्यान, मुंबईत परराज्यातील नागरिकांपासून परदेशातील नागरिकांचाही समावेश पाहायला मिळाला. यामुळे अनेकांचे वैभव वाढले असून अनेकांनी या शहरातून मोठी प्रगती साध्य केली आहे. यामुळे आता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.