Accident News : आरक्षणाच्या मोर्चातून परतत होते पाच जण, घडली भयंकर घटना, घटनेने गाव हळहळलं..

Accident News : हिवाळी अधिवेशनावर नागपूरमध्ये धनगर समाजाकडून मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी धनगर समाज मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता. असे असताना एक दुःखद बातमी समोर आली आहे. हा मोर्चा संपवुन परत निघालेल्या परभणी जिल्ह्यातील मोर्चेकऱ्यांच्या गाडीला झालेल्या अपघतात दोघांचा मृत्यू झाला आहे.

यामुळे मोठी पळापळ झाली. या अपघातात तिघांची प्रकृती गंभीर आहे. पालम येथील सरफराजपुर गावातील काहीजण या मोर्च्याला गेले होते. यावेळी ही घटना घडली आहे. या अपघातात गाडीचा अक्षरशः भुगा झाला आहे. रात्री तीन वाजेच्या सुमारास माहूरजवळ पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या गाडीला जोराची धडक दिली.

या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. परभणीच्या पालम तालुक्यातील सरफराजपुर येथील अनेकजण धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी नागपुर येथे काढलेल्या मोर्चासाठी गेले होते.

दरम्यान, यात लक्ष्मण पंडितराव वाघमारे आणि रमेश दत्तराव वाघमारे असे मयत व्यक्तीचे नावे आहे. मोर्चा झाल्यानंतर हे सर्वजण परत गावाकडे निघाले होते. रात्री तीन वाजेच्या सुमारास माहूरजवळ या मोर्चेकऱ्यांच्या गाडीला पाठमागून अज्ञात वाहनाने धडक दिली.

यामुळे काही समजायच्या आतच ही घटना घडली आहे. गाडीतील रंगराव संपतराव वाघमारे, राम बालाजी बनसोडे, बापूराव मारोती वाघमारे हे अपघातात गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जखमींची देखील परिस्थिती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे सरफराजपुर गावात शोककळा पसरली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.