Nagpur Accident : नागपूरमध्ये भीषण अपघात! 6 जणांचा जागीच मृत्यू, दोन्ही गाड्याचा झाला भुगा…

Nagpur Accident : नागपूरमध्ये अपघाताची एक भीषण घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील काटोल मध्ये क्वालीस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. मध्यरात्रीनंतर काटोल तालुक्यातील सोनखांब आणि ताराबोडीमध्ये ही घटना घडली.

क्वालिस गाडी नागपूरवरून काटोलच्या दिशेने जात होती. त्यावेळी ट्रकने जोरदार धडक दिली आणि त्यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला आहे. नागपुरात एका लग्नाचा कार्यक्रम आटपून हे सर्वजण काटोलच्या दिशेने जात होते.

क्वालिस गाडी नागपूरवरून काटोलच्या दिशेने जात होती. त्यावेळी ट्रकने जोरदार धडक दिली. हा अपघात खूप भीषण होता. यामध्ये दोन्ही गाड्यांचा अक्षरशः भुगा झाला आहे. यामुळे याठिकाणी मोठी गर्दी झाली होती.

जखमीला नागपुरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर याठिकाणी पोलीस यंत्रणा हजर झाली. मृतदेह बाहेर काढून ते रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेमुळे कुटूंबाला मोठा धक्का बसला.

घटनेनंतर कुटूंबाने एकच आक्रोश केला. या अपघाताबाबत पोलीस तपास करत आहेत. ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र याबाबत खरे कारण अजूनही समोर आले नाही.

अपघातानंतर याठिकाणी मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी गर्दी कमी करून याठिकाणी वाहतूक सुरळीत चालू केली. अपघातानंतर याठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. पुढील तपास नागपूर पोलीस करत आहेत.