पती मुंबईत नोकरीला, पत्नी महिन्याभरापासून बेपत्ता; व्हाट्सॲपवर आलेले फोटो पाहून पतीला घामच फुटला

सध्या देशभरात सीमा हैदर आणि अंजू चर्चेचा विषय ठरल्या आहे. प्रेमासाठी त्या आपल्या देशाला सोडून दुसऱ्या देशात गेल्या त्यामुळे त्या चर्चेत आहे. असे असतानाच आता राजस्थानची दिपीकाही चर्चेत आली आहे.

राजस्थानमधील दीपिका नावाची महिला मुलांना सोडून प्रियकरासोबत परदेशात पळून गेली आहे. आता याप्रकरणी तिच्या पतीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिस सध्या तिचा शोध घेत आहे, पण ती अजून भेटलेली नाही.

राजस्थानच्या भैमई गावची ती रहिवासी आहे. ती १० जुलैला एका तरुणासोबत पळून गेली होती. घरी काहीही न सांगता दीपिका थेट परदेशात निघून गेली. दीपिकाला दोन मुलं आहेत. त्यामध्ये एक मुलगी ११ वर्षांची आहे तर दुसरा मुलगा हा ७ वर्षांचा आहे.

पत्नी सोडून गेल्यामुळे पतीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी तिचा शोध सुरु केला. पण अजूनही ती सापडलेली नाही. त्यामुळे संतप्त लोकांनी पोलिस ठाण्यासमोरच आंदोलन करायला सुरुवात केली आहे.

दीपिका आपल्या दोन मुलांसोबत गावात राहत होती. तर तिचा पती हा मुंबईला कामाला होता. ती नेहमी वैद्यकीय तपासणीसाठी गुजरातला जायची. १० जुलैला देखील ती हेच कारण सांगून गुजरातला गेली होती. पण १३ जुलैपर्यंत ती परतलीच नाही.

अशात पतीने तिला व्हॉट्सअप कॉल केला. त्यावेळी तिने फोन उचलला. ती म्हणाली की, तु मला आनंदी ठेवत नाहीस. त्यामुळे दूर जात आहे. पतीला हे ऐकून धक्काच बसला. त्याने मुंबईहून थेट गाव गाठलं. तेव्हा पत्नी रक्कम आणि दागिने घेऊन फरार झालेली असल्याचे त्याला कळाले.

त्यानंतर पतीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आता त्याच्या पत्नीचा शोध सुरु केला आहे. पण अजूनही तिचा शोध लागलेला नाही. अशात तिच्या पतीच्या व्हॉट्सअपवर काही फोटो आले आहेत. त्यामध्ये ती एका तरुणासोबत दिसून येत आहे.