Jalgaon news : ५ दिवसांवर तरुणाचे लग्न, घरात आनंदाच वातावरण, पत्रिकाही वाटल्या अन् मुलाची बाॅडी घरी आली…

Jalgaon news : जळगावमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. याठिकाणी विवाहाला केवळ पाच दिवस बाकी असताना नियोजित वराचा शेतातील विहिरीत पडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. सकाळी ही घटना घडली आहे.

या घटनेमुळे परिवारासह मित्रमंडळीवर दुखा:चा डोंगर कोसळला आहे. घरातील मोठ्या मुलाचा विवाह असल्यामुळे संजय महाजन व त्यांच्या परिवारात आनंदाचे वातावरण होते. लग्नाची तयारी देखील झाली होती. मात्र लग्नाच्या आधीच ही घटना घडली आहे.

नातेवाईक, मित्रपरिवार यांना लग्न पत्रिकांचे वाटप देखील करण्यात आले होते. मात्र या घटनेमुळे सगळं काही थांबल आहे. भावेश संजय महाजन हा काका ज्ञानेश्वर विठ्ठल महाजन यांच्या घरी गेला आणि तुमची गाडी द्या मी नाश्ता करायला जात आहे, असे सांगून गेला.

नंतर बराच वेळ झाल्यानंतर देखील भावेश न आल्यामुळे ज्ञानेश्वर महाजन यांनी भावेशच्या घरी जाऊन चौकशी केली. तो अद्याप घरी आला नसल्याचे त्याच्या आई वडिलांनी सांगितले. नंतर
त्याच्या शेताच्या जवळ असलेल्या सुनील पाटील यांच्या शेतातील विहिरीत पडला असून त्याचे प्रेत पाण्यावर तरंगत असल्याचे समोर आले.

दरम्यान, या घटनेनंतर कुटूंबाला एकच धक्का बसला आहे. विवाहाची पूर्ण तयारी करण्यात आली होती. मात्र नियतीने काही क्षणातच महाजन परिवाराचा आनंद हिसकावून घेतला. यामुळे कुटूंबाला मोठे दुःख झाले.

दरम्यान, पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव पुढील तपास करीत आहेत. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.