तिने माझा फक्त वापर केला! कोल्हापूरात प्रेमप्रकरणातून तरुणाने संपवले जीवन, चिठ्ठीत लिहीले की…

प्रेम प्रकरणातून अनेकदा धक्कादायक घटना समोर येत असतात. अशीच एक घटना आता कोल्हापूरमधून समोर आली आहे. एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून आपला जीव दिला आहे. विठ्ठल जाधव असे त्या तरुणाचे नाव आहे.

एकतर्फी प्रेमातून त्याने जीव दिल्याचे समोर आले आहे. तरुण आपल्या मुलीवर प्रेम करतो हे कळल्यानंतर तरुणीच्या वडिलांनी निर्भया पथकाला याबाबत कळवले होते. त्यानंतर त्याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे.

जीव देण्यापूर्वी विठ्ठलने एक चिठ्ठी लिहिली होती. त्यामध्ये त्याने सर्व सांगितले आहे. मुलीने माझा केवळ वापर केला आहे. तसेच मुलीच्या वडिलांनीही मला भिती दाखवली होती. त्यामुळे मी हा निर्णय घेत असल्याचे त्याने म्हटले होते.

मुलीने माझा फक्त फायदा घेतला आहे. तसेच मुलीचे वडील मला भिती दाखवत आहे. निर्भया पथकाच्या माध्यमातून त्यांनी माझ्यावर दबाव आणला. त्यांनी माझ्याकडून लिहून घेतलं की मी परत तिला मेसेज करणार नाही. पण मी तिच्याशिवाय जगू शकत नाही. माझ्याकडे हाच एक पर्याय आहे. आयएम सॉरी, असे त्याने चिठ्ठीत लिहीले होते.

या घटनेमुळे संपुर्ण परिसरामध्ये एकच खळभळ उडाली. तरुण मुलाने असे केल्यामुळे विठ्ठलच्या कुटुंबालाही मोठा धक्का बसला आहे. त्यांनी याप्रकरणी पोलिस तक्रार दाखल केली असून पोलिस तपास करुन पुढील कारवाई करणार आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीही अशीच एक घटना सांगली जिल्ह्यातील शिराळामध्ये घडली होती. तुषार पांढरबळे नावाच्या एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून जीव दिला होता. त्याने वारणा नदीपात्रामध्ये उडी घेत जीवन संपवले होते. त्यानंतर नदीपात्रापासून ४० किलोमीटर लांब तुषारचा मृतदेह सापडला होता.