Mumbai news : लव्ह-मॅरेज केलं म्हणून वडिलांना आला राग, आधी लेकीला संपवलं, नंतर जावयाला…

Mumbai news : मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रेमविवाह केला म्हणून वडिलांनी आपल्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. एवढेच नव्हे तर, त्याने नंतर जावयाचा खून घडवून आणला.

या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. करण रमेश चंद्र आणि गुलनाज अशी मृत पती-पत्नीचे नाव आहेत. गोवंडी पोलिसांनी या दुहेरी हत्याप्रकरणात मुलीचे वडील, भाऊ यांच्यासह सहा जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये तीन आरोपी अल्पवयीन आहेत.

गोवंडी परिसरात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह सापडला होता. काहीतरी संशयास्पद वाटत असल्याने गोवंडी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून उपायुक्त हेमराजसिंह राजपूत आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुदर्शन होनवडजकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची दहा पथके तयार करण्यात आली.

हा मृतदेह उत्तर प्रदेश येथील रहिवासी करण चंद्र याचा असल्याचे निष्पन्न झाले. करणची हत्या झाल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी सखोल तपास सुरू केला. करण आणि गुलनाज खान या दोघांनी प्रेमविवाह केल्याचे समजले.

दरम्यान, या प्रेमविवाहाला घरच्यांचा विरोध होता. पोलिसांनी गुलनाजचे वडील गोरा रईमुद्दीन खान यांना ताब्यात घेतले. खान यांनी मुलगा सलमान आणि चार जणांच्या मदतीने करणची हत्या केल्याची कबुली दिली.

या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. या घटनेमुळे मात्र एकच खळबळ उडाली असून अशा प्रकारच्या अनेक घटना समोर येत आहेत.