नको मालदीव नको लक्षद्वीप, ‘ही’ आहेत महाराष्ट्रातील 5 निसर्गसंपन्न गावं, सौंदर्य पाहून म्हणाल जणू स्वर्गच..

महाराष्ट्र राज्याला निसर्गाचे भरभरून वरदान लागले आहे. सह्याद्री ढाल बनून उभा आहेच पण समुद्राचे सौंदर्यही महाराष्ट्राला लाभले आहे. यामुळे महाराष्ट्र हा पर्यटनात देखील पुढे आहे. देश-विदेशातून पर्यटक येथे फिरण्यासाठी येत असतात. पण अजूनही महाराष्ट्रातील अनेक निसर्गरम्य ठिकाणं दुर्लक्षित आहेत.

असे असताना आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील पाच सुंदर गावे सांगणार आहोत. जी बघून तुम्ही देखील या ठिकाणांच्या प्रेमात पडाल. यामध्ये पहिले नाव म्हणजे मोराची चिंचोली. गर्द झाडीने वेढलेले व निसर्गाने नटलेले हे गाव तुम्हाला प्रेमात पाडू शकेल. येथे भरपूर मोर आहेत. हे गाव पुणे-नगर रस्त्यावर शिरूर, शिक्रापूर जवळ आहे.

रांजणगाव गणपतीपासून साधारण २३ किमी. अंतरावर आहे. पावसाळा व हिवाळा या काळ येथे फिरण्यासाठी उत्तम आहे. तसेच रत्नागिरीतील पुर्णगड म्हणजे वैभवशाली इतिहासाचं उत्कृष्ट उदाहरण आहे.

जगभरातील अनेक इतिहासप्रेमी येथे भेट देतात. मुचकुंदी नदीच्या मुखाजवळ पूर्णगडाचा छोटासा किल्ला गतवैभवाच्या खाणाखूणा जपत उभा आहे. याठिकाणी सुंदर सागर किनारा आहे. तसेच पाटगाव हे कोल्हापुरात गाव असून जंगलाची सैर आणि अस्सल मधाची चव चाखण्यासाठी या गावाला तुम्ही भेट देऊ शकता.

राष्ट्रीय पातळीवर या गावाने ओळख मिळवली आहे. पाटगाव जवळच रांगणा किल्ला म्हणजेच प्रसिद्धगड ही वास्तू आहे. किल्ल्यावरून आजूबाजूचे गाव, नदी आणि दरी यांचे निसर्गरम्य दृश्य दिसते. ट्रेकिंगसाठीही हे उत्तम ठिकाण आहे. धरण देखील याठिकाणी आहे.

तसेच पुरुषवाडी हे गाव काजवा उत्सवासाठी प्रसिद्ध आहे. या जादुई नैसर्गिक घटनेचे साक्षीदार बनण्यासाठी पावसाळ्यात लाखो पर्यटक इथे येतात. इगतपुरीपासून 70 किमी अंतरावर पुरुषवाडी आहे. कॅपिंगसाठी किंवा एक दिवसाच्या सहलीसाठी तुम्ही याठिकाणी येऊ शकतात. 

तसेच देहना या गावात खळखळणारी नदी, मनाचा ठाव घेणारी हिरवळ आणि अप्रतिम स्थानिक खाद्यपदार्थ यामुळं हे गाव तुम्हाला खूपच आवडेल. हे गाव मुंबईपासून 130 किमी अंतरावर अहमदनगर येथे हे गाव आहे. येथून जवळच कळसूबाई शिखर आहे.