व्याही आणि विहिणीबाईंचं जडलं प्रेम, घरी समजलं, घरातून पळाले अन् घडलं भयंकर..

उत्तर प्रदेशच्या हरदोईमध्ये एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. हरदोई जिल्ह्यात रविवारी पहाटे एका इसमाने एका महिलेसह ट्रेनसमोर झोकून देत आत्महत्या केली. दोघेही लखीमपूर जिल्ह्याचे रहिवासी होते. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत तपास केला असता अजून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत माहिती अशी की, ४० वर्षीय व्यक्तीने त्याच्या प्रेयसीसोबत आयुष्य संपवले. ज्या महिलेसोबत त्याचे प्रेमसंबंध होते, ती त्याची विहिण होती.

तसेच या व्यक्तीला एक मुलगी होती. त्याच्या पत्नीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. तर मृत महिलेला दोन मुली आणि एक मुलगा आहे. रामनिवास राठोड यांनी त्यांच्या लेकीचा विवाह आशा देवी यांच्या मुलासोबत ठरवला होता.

मुलीच्या लग्नाच्या बोलणीसाठी रामनिवास आशा देवींच्या घरी गेले. तेव्हा ते आशा देवींच्या प्रेमात पडले. तसेच त्यांचा देखील होणार आला. त्यानंतर दोघे पळून गेले. आशा देवींच्या पतीने या प्रकरणी पोलीस तक्रार दाखल केली होती.

दरम्यान, दोन्ही कुटुंबांचा या संबंधांना विरोध होता. तसेच त्यांच्याबद्दल नातेवाईकांमध्ये, गावात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या. यामुळे ते दोघेही तणावात होते. यामुळे त्यांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आत्महत्या केली.

सगळीकडे झालेल्या बदनामीमुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे अपर पोलीस अधीक्षक दुर्गेश सिंह यांनी सांगितले. या घटनेमुळे मात्र एकच खळबळ उडाली आहे. पोलीस याबाबत तपास करत आहेत.