North-East Delhi : बायकोच्या जवळ जायची तीव्र इच्छा, पण दरवेळी बायको नाही म्हणायची, नाराज पतीने शेवटी केलं असं काही की..

North-East Delhi : उत्तर-पूर्व दिल्लीच्या गोकलपुरी परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली असून, पत्नीने वारंवार दूर जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे संतप्त झालेल्या पतीने तिला चाकू भोसकून ठार मारले. आरोपी हर्ष गोयलला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्यावर IPC कलम 103 (1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पत्नीच्या निर्णयाने अस्वस्थ पतीने घेतले टोकाचे पाऊल
गेल्या काही दिवसांपासून हर्ष गोयल आपल्या पत्नीला घरी परतण्याची विनंती करत होता, मात्र वारंवार नकार मिळाल्याने तो निराश आणि संतप्त झाला. 17 फेब्रुवारी रोजी पत्नी आपल्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी जात असल्याची माहिती हर्षला होती. त्याने तिथे जाऊन तिला पुन्हा घरी परत येण्याची विनंती केली, परंतु तिने नकार दिला. या वादानंतर, रागाच्या भरात त्याने पत्नीला चाकू भोसकून पळ काढला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांची तत्परता
सकाळी 9 वाजता गोकलपुरी पोलिसांना माहिती मिळाली की जोहरीपूर पोलीस चौकीजवळ एक महिला रक्ताच्या थारोळ्यात पडली आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता, तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला.
पोलिसांनी आरोपीचा शोध कसा घेतला?
पोलिसांनी तपास सुरू करताच महिलेचा मोबाईल गायब असल्याचे आढळले. सीसीटीव्ही फुटेज आणि विविध कोनातून केलेल्या तपासानंतर त्यांचा संशय पती हर्ष गोयलवर गेला. पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता, सुरुवातीला तो निष्पाप असल्याचे भासवू लागला. मात्र, कठोर चौकशीनंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
“पत्नीला परत आणण्यासाठी शेवटचा प्रयत्न केला, पण…” – आरोपीचा कबुलीजबाब
पोलिसी खाक्या दाखवताच हर्ष गोयलने पूर्ण कहाणी उलगडली.
“मी काही दिवसांपूर्वी एनडीपीएस प्रकरणात जेलमध्ये होतो. सुटल्यानंतर पत्नीशी वारंवार वाद होत होते. त्यामुळे ती घर सोडून निघून गेली. मी तिला अनेकदा विनवण्या केल्या, पण ती घरी परतण्यास तयार नव्हती. 17 फेब्रुवारीला मुलांना शाळेत सोडल्यानंतर तिला भेटून समजावण्याचा माझा शेवटचा प्रयत्न होता. मात्र, तिने पुन्हा नकार दिला आणि रागाच्या भरात मी चाकू भोसकला.”
आरोपी अटकेत, घटनेने कुटुंब उध्वस्त
या हत्येमुळे कुटुंबावर मोठा आघात झाला असून, मुलांचे जीवन अनाथासारखे झाले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करून पुढील कारवाई सुरू केली आहे.