---Advertisement---

world cup : सकाळी उठले तर बॉसचा मेसेज होता की..’; विश्वचषकातील भारताच्या पराभवानंतर कंपनीचा कर्मचाऱ्यांना दणका

---Advertisement---

world cup : विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारत विश्वविजेता होईल, अशी आशा बाळगणाऱ्या भारतीयांचे स्वप्न केवळ स्वप्नच राहिले. टीम इंडियाचा पराभव पचवता न आल्याने चाहते ढसाढसा रडू लागले.

गुरुग्राम येथील एका कंपनीनेही आपल्या कर्मचाऱ्यांसाठी सुट्टी जाहीर केली आहे. याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया. टीम इंडियाच्या पराभवामुळे त्यांचे कर्मचारी दु:खी होतील या विचाराने गुरुग्राममधील ‘मार्केटिंग मूव्हज एजन्सी’ने सोमवारी सुट्टी जाहीर केली आहे.

कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्याची सक्ती न करता कंपनीने हा निर्णय घेतला. कंपनी कर्मचारी दीक्षा गुप्ता यांनी लिंक्डइनवर ही पोस्ट केली आहे. आधीच परिस्थिती समजून घेत कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना टीम इंडियाच्या पराभवाच्या धक्क्यातून सावरण्यासाठी वेळ दिला.

बॉसने पाठवलेल्या मेसेजचा स्क्रीन शॉटही सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला होता, ज्यामध्ये लिहिले होते, “कालच्या वेदनातून सावरण्यासाठी तुम्ही सुट्टी घ्या.”

वास्तविक, अनेक नेटिझन्स कंपनीच्या बॉसच्या या निर्णयाचे कौतुक करत आहेत आणि म्हणत आहेत की कोणीही सामना पाहण्यासाठी सुट्टी देईल, परंतु नुकसान भरून काढण्यासाठी सुट्टी जाहीर करणे ही कौतुकास्पद गोष्ट आहे. आधीच काही ठिकाणी टीम इंडियाला पराभव सहन न झाल्याने अनेक ठिकाणी आत्महत्या केल्या.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---