BCCI आणि निवडकर्त्यांना रोहीत शर्माचा थेट इशारा; म्हणाला, तुम्हाला माझी टी-20 वर्ल्ड कपमध्ये निवड करायची असेल तर…

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि निवड समितीला स्पष्टपणे विचारले आहे की ते आगामी T20 विश्वचषक (T20 World Cup 2023) मध्ये त्याला खेळवण्याचा विचार करत आहेत की नाही.

एकदिवसीय विश्वचषक संपल्यानंतर, रोहित शर्माने बोर्ड अधिकारी, निवडकर्ते आणि मुख्य प्रशिक्षक यांच्यासोबत एक मोठी बैठक घेतली, ज्यामध्ये रोहितने टी-20 आंतरराष्ट्रीय मधील त्याच्या भविष्याबद्दल प्रश्न उपस्थित केले.

या बैठकीत रोहितला टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या रणनीतीचा एक भाग असल्याचे संकेत मिळाल्याचे वृत्त आहे. या बैठकीत बीसीसीआयचे सचिव जय शाह, उपाध्यक्ष राजीव शुक्ला, कोषाध्यक्ष आशिष शेलार यांचा समावेश होता.

भारतीय संघाचे निवडकर्ते, मुख्य प्रशिक्षक आणि कर्णधार यांच्यासोबत ते ही बैठक घेऊन संघाच्या भविष्यातील योजनांवर चर्चा करत होते. पुढील 6 महिन्यांनंतर वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणार्‍या आगामी T20 विश्वचषक स्पर्धेसाठी त्यांचा रोडमॅप काय आहे हे अधिकाऱ्यांना जाणून घ्यायचे होते.

रोहित सध्या सुट्टीच्या दिवशी आपल्या कुटुंबासह लंडनला गेला आहे, तो झूम कॉलद्वारे नवी दिल्लीत झालेल्या या बैठकीत सहभागी झाला होता. वृत्तपत्रानुसार, रोहितने विचारले होते की, जर बोर्ड त्याला टी-२० विश्वचषकात खेळताना पाहायचे असेल तर ते आताच स्पष्ट करावे.

रोहितने विचारले होते की, ‘तुम्हाला टी-२० वर्ल्ड कपसाठी माझी निवड करायची असेल, तर आत्ताच सांगा की इथून पुढे कसे जायचे?’ रोहितच्या या प्रश्नानंतर बोर्डाचे सर्व अधिकारी, मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि प्रशिक्षक राहुल राहुल द्रविडने एकमताने मान्य केले की आगामी स्पर्धेत भारतीय संघाचे कर्णधारपदासाठी रोहित हा सर्वोत्तम पर्याय आहे.

यानंतर निवडकर्त्यांनी त्याला तातडीने टी-२० आंतरराष्ट्रीय संघात परतण्यास सांगितले. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर मर्यादित षटकांच्या मालिकेत रोहितने संघाची कमान सांभाळावी अशी त्यांची इच्छा होती.

परंतु रोहितने येथे मर्यादित षटकांच्या मालिकेतून विश्रांतीची मागणी केली, त्यानंतर निवडकर्त्यांनी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टी-20 आणि केएल राहुलच्या नेतृत्वाखालील संघांची घोषणा केली.