Rajasthan : राजस्थानला सुट्टीसाठी गेलेल्या जळगावातील कुटूंबासोबत घडली भयंकर घटना, ६ जण जागीच संपले

Rajasthan : राजस्थानमधील बारमेर येथील धोरिमाना पोलीस स्टेशन परिसरात कार आणि ट्रेलर वाहनात भीषण टक्कर झाली. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांसह सहा जणांचा मृत्यू झाला. ट्रेलर आणि कार यांच्यात झालेल्या भीषण टक्करनंतर हा अपघात झाला.

या घटनेनंतर धोरिमाण्णा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. राजस्थानच्या बारमेर जिल्ह्यात सोमवारी संध्याकाळी ट्रक आणि कार यांच्यात झालेल्या धडकेत तीन मुलांसह एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला तर अन्य एक जण जखमी झाला.

धोरिमान्ना स्टेशन हाऊस ऑफिसर (SHO) सुखराम विश्नोई यांनी सांगितले की, धनराज (45), स्वरांजली (5), प्रशांत (5), भाग्य लक्ष्मी (1), गायत्री (26) अशी या अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

स्टेशन प्रभारी यांनी सांगितले की, कारमधील प्रवासी हे महाराष्ट्रातील भालगावचे रहिवासी असून ते जैसलमेरला जात होते. मृतदेह शवविच्छेदनासाठी धोरिमाण्णा येथील शासकीय रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला असून जखमींना उपचारासाठी सांचोर येथे पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

अपघाताची माहिती मिळताच धोरिमाण्णा उपविभागीय अधिकारी लखाराम यांनीही घटनास्थळी पोहोचून संपूर्ण अपघाताची माहिती घेतली. अपघाताची माहिती मिळाल्यावर अमळनेरमधील रहिवासी असलेले मदत व पूनर्वसन मंत्री अनिल पाटील आणि माजी आमदार शिरीष चौधरी यांनी मदतीसाठी आपआपल्या पध्दतीने राजस्थानमध्ये संपर्क साधला.

राजस्थानमधील जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांशी संपर्क साधला. अपघाताची माहिती घेत मदतकार्य करण्याबाबतच्या सुचना केल्या. ऐन दिवाळीत झालेल्या या भीषण अपघातामुळे संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान मयतांचे नातेवाईक घटना कळताच राजस्थानकडे रवाना झाले आहेत.