DMK फॅक्टरमुळे भाजपला धक्का! फडणवीसांचा फोन, मोदींकडून नो रिस्पॉन्स; ‘तो’ निर्णय राहिल्याने सगळं गणित चुकलं..

देशात काल लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला. यामध्ये राज्यात भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. भाजपला यंदा २३९ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे पुन्हा सरकार स्थापन करायचं असल्यास भाजपला मित्रपक्षांचा टेकू लागेल. यामुळे दिल्लीत घडामोडी सुरू आहेत.

आता केंद्रात मोदी सरकार नसेल, तर एनडीए सरकार असेल. असेही म्हटले जात आहे. महाराष्ट्रात महायुतीला मोठा धक्का बसला आहे. 2019 ला एनडीएला राज्यात ४१ जागा मिळाल्या होत्या. आता या जागा १७ वर आल्या आहेत. यावेळी तर सोबत अनेकांना त्यांनी घेतले होते.

गेल्या निवडणुकीत भाजपच्या २३ जागा निवडून आल्या होत्या. पण यंदा संपूर्ण महायुतीला मिळूनही त्या जागांच्या जवळपास जाता आलेले नाही. विदर्भात भाजपला मोठा फटका बसला आहे. विदर्भात मागील निवडणुकीत एनडीएने १० पैकी ८ जागा जिंकल्या होत्या. यंदा महाविकास आघाडीने १० पैकी ७ जागा जिंकल्या आहेत. यामुळे याबाबत अनेकांना पराभव स्वीकारावा लागला.

विदर्भात गेल्यावेळी भाजपने ६ जागा लढवत ५ जागा जिंकल्या होत्या. यंदा भाजपने ७ जागा लढवल्या. पण त्यांना केवळ २ जागा जिंकल्या आहेत. नागपूर, अकोल्यात भाजपने विजय मिळवला. अनेक ठिकाणी काँग्रेसने भाजपची दाणादाण उडवली.

दरम्यान, धनगर, माळी, कुणबी समाजाचे प्रमाण विदर्भात मोठं आहे. कुणबी समाजातील नेत्याला मंत्रिमंडळात घेण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी जानेवारीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन केला होता. पण मोदींकडून ग्रीन सिग्नल न मिळाल्याने मंत्रिमंडळ विस्तार थांबला. याचा फटका बसल्याची माहिती आहे.

दरम्यान, कुणबी मतं आपल्याकडे खेळण्याचा फडणवीसांचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. हा फटका लोकसभा निवडणुकीत भाजपला बसलेला दिसतोय. उपमुख्यमंत्री फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विदर्भात पक्षाचं पानीपत झालं. यामुळे जागा कमी झाल्या.