---Advertisement---

चिखलातून यायचा रडण्याचा आवाज, जवळ गेल्यावर एक हात दिसला; चिखल बाजूला करताच समोरचं दृश्य पाहून सगळेच हादरले

---Advertisement---

उत्तर प्रदेशातील कानपूर गावात हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. येथे एका नवजात अर्भकाला मातीत जिवंत गाडल्याची घटना समोर आली असून, त्याची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.

प्रकरण कानपूर देहाटमधील मुसानगर पोलीस स्टेशन हद्दीतील पुलंदर गावातील आहे. असे सांगितले जात आहे की जेव्हा चिखलातून मुलाच्या रडण्याचा आवाज आला तेव्हा एका जोडप्याने त्याला मातीखालून बाहेर काढले, त्यानंतर त्यांनी त्याला रुग्णालयात दाखल केले.

मिळालेल्या माहितीनुसार, मुसानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुलंदर गावातील प्राथमिक शाळेसमोरील रमण वाजपेयी यांच्या बागेत मातीत गाडलेले जिवंत नवजात बालक आढळून आल्याची माहिती मिळताच गावात एकच खळबळ उडाली.

नवजात बालकाला वाचवणाऱ्या पुलंदर गावातील रहिवासी राजेश यांची पत्नी नीलम यांनी सांगितले की, काही लहान मुले बागेतून बाहेर पडत होती, जेव्हा त्यांनी नवजात मुलाचे हात पाहिले तेव्हा त्यांनी आरडाओरडा केला.

चारा घेऊन ती काही महिलांसोबत शेतातून परतत असताना तिला मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. जवळ जाऊन पाहीले तर एक हात बाहेर आलेला दिसत होता. माती उचलताच मातीत गाडलेले बाळ पाहताच तिला धक्का बसला.

तिने तातडीने गावाला कळवून चिखलात गाडलेल्या मुलाला बाहेर काढून रुग्णवाहिकेत सीएससी देवीपूर येथे आणले, तेथे डॉक्टरांनी त्या बाळावर उपचार केले.

सीएचसीचे अधीक्षक डॉ. विकास यांनी सांगितले की, मुलांचा जन्म सुमारे 7 तासांपूर्वी झाला आहे. मुलाला श्वास घेण्यास त्रास होत आहे, त्याला ऑक्सिजन देण्यात आला आहे आणि मातीत गाडल्यामुळे त्याच्या शरीरावर काही खुणा निर्माण झाल्या आहेत. तो लवकरच बरा होईल.

मुलाची प्रकृती ठीक असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. याबाबत मुसानगर पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. पुलंदर येथील रहिवासी असलेल्या राजेशने सांगितले की, त्याला तीन मुली आहेत आणि या बालकाला मी मुलाप्रमाणे मानत आहे.

मुलगा मिळाल्याने तो खूप आनंदी आहे. त्याचे पालनपोषण करायचे आहे, तो सीएचसीमध्ये राहून मुलांची काळजी घेत आहे. त्याची पत्नी नीलम आपल्या मुलासोबत असून त्याची काळजी घेत आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---