पिपाणीमुळे आमचं मोठं नुकसान, ते चिन्ह काढून टाका, अन्यथा….!! शरद पवार यांचा थेट इशारा

राज्यात लोकसभा निवडणुकीत अनेकांना मोठा फटका बसला. आता सगळे पक्ष विधानसभेची तयारी करत आहेत. यामुळे अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. अशातच आता एक महत्वाची बातमी समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीचा आढावा घेतल्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे.

याबाबत आता महत्वाची माहिती पुढे आली आहे. निवडणूक चिन्हाबाबत राष्ट्रवादी शरद पवार गटाने हे पत्र लिहिले आहे. पिपाणी हे चिन्ह निवडणुकीच्या चिन्हाच्या यादीतून वगळावं, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पिपाणी या चिन्हामुळं या निवडणुकीत आम्हाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे या बाबात निर्णय घ्या. अन्यथा आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार, असे या पत्रात म्हणण्यात आले आहे. यामुळे आता आयोग नेमका काय निर्णय देणार हे लवकरच समजेल.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने निवडणूक आयोगाला पत्र लिहित निवडणूक चिन्हाबाबतची महत्वाची टिपण्णी केली आहे. पिपाणी हे चिन्ह निवडणुकीच्या चिन्हाच्या यादीतून काढून टाकावे या चिन्हामुळे राष्ट्रवादी पक्षाचं लोकसभा निवडणुकीमध्ये मोठं नुकसान झालं आहे.

असे या पत्रात म्हणण्यात आलं आहे. याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा न्यायालयाचं दार ठोठावणार असल्याचा या पत्रात उल्लेख आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने यंदाची लोकसभा निवडणूक ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या चिन्हावर लढवली.

असे असताना मात्र या निवडणुकीत काही अपक्ष उमेदवारांना ‘पिपाणी’ चिन्ह देण्यात आले होते. यामुळे पक्षाचे मोठे नुकसान झाले, असे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे म्हणणं आहे. साताऱ्याची जागा राष्ट्रवादीच जिंकणार होती मात्र ‘पिपाणी’ चिन्हामुळे ती जागा हातातून गेली, हे देखील तेवढंच खर आहे.

दरम्यान, तुतारी वाजवणारा माणूस आणि ‘पिपाणी’ या चिन्हांमध्ये साधर्म्य आहे. यामुळे सामान्य लोकांना यातील फरक लवकर लक्षात येत नाही. यामुळे नुकसान होत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत याचा फटका बसू नये म्हणून शरद पवार गटाने याबाबतचं पत्र निवडणूक आयोगाला लिहिले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.