धक्कादायक! ११ दिवसांपुर्वी मुलाला जन्म, नंतर आईची हत्या तर वडिलांची आत्महत्या, कारण…

घरगुती वादातून एका युवकाने विष पाजून पत्नीची हत्या केली त्यानंतर स्वत: गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सहारनपूर कोतवाली येथील देवबंद येथे ही घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत तपास सुरू आहे.

विशेष म्हणजे, ११ दिवसांपूर्वी जोडप्याने मुलाला जन्म दिला होता. त्यामुळे आनंदाचे वातावरण असताना अचानक पत्नीच्या वागणुकीमुळे पती त्रस्त असल्याने त्याने हे धक्कादायक पाऊल उचलले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत पतीने सुरुवातीला पत्नी प्रतिभाला विष देऊन ठार केले. त्यानंतर त्याने देखील गळफास घेत आत्महत्या केली. धर्मपूर सरावगी येथे घटनास्थळी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. यामध्ये म्हटले आहे की, जीवनात खूप त्रस्त झालो आहे. जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा सर्व खूप आनंदात होते. परंतु मी नाही.

तसेच जिच्याशी लग्न करतोय ती माझ्या कुटुंबाला उद्ध्वस्त करेल असे वाटले नव्हते. प्रतिभाने पवित्र नात्यावर आरोप केले. सासूसासरेही याच प्रकारे आरोप करत होते. प्रतिभामुळे खूप त्रास झाला. त्यामुळे प्रतिभाला संपवत आहे आणि स्वत:ला संपवून टाकतोय, असे यामध्ये लिहिले होते.

तसेच चिठ्ठीत लिहिले आहे की, मी संपूर्ण शुद्धीत प्रतिभा आणि स्वत:ला संपवून घेत आहे. माझ्या मुलाचे नाव यश आहे. हा मुलगा माझ्या आईकडे द्या. माझी आई आणि दोन बहिणी येईपर्यंत माझ्यावर अंत्यसंस्कार करू नये. आत्महत्येपूर्वी दलीपने व्हॉट्सअप स्टेटसवरही सुसाईड नोट ठेवली होती.

यामुळे ती क्षणात व्हायरल झाली. सुसाईड नोटखाली त्याने मोबाईलचा पासवर्ड लिहिला होता. यामुळे घटनेची लगेच माहिती झाली. याबाबत पोलीस सध्या तपास करत आहेत. घटनेमुळे मात्र एकच खळबळ उडाली आहे.