बकरीने घेतला तिला बळी देणाऱ्या व्यक्तीचा जीव; किस्सा वाचून हादरून जाल

जिल्ह्यातील एका तरुणाचा मांस खाल्ल्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तरुणाच्या जिद्दीमुळे त्याला त्याचा जीव गमवावा लागला. त्या तरुणाचा नवस होता आणि तो नवस पूर्ण झाल्यानंतर त्या तरुणाने आपल्या देवाला बकऱ्याचा बळी दिला.

त्याने त्या बकऱ्याचे मटन बनून सर्व नातेवाईकांना खाऊ घातले आणि बकऱ्याच्या डोक्याचे मांस स्वतःसाठी ठेवले. यादरम्यान तरुणाने बकऱ्याचा कच्चा डोळा खाल्ल्याने त्याला जीव गमवावा लागला. या तरुणाच्या श्वास नलिकेत शेळीचा डोळा अडकल्याने त्याला श्वास घेता येत नसल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे त्याचा मृत्यू झाला.

वास्तविक, सूरजपूरच्या मदनपूर गावात राहणारे 50 वर्षीय बागर साई यांनी नवस पूर्ण केल्यानंतर खोपा धाममध्ये पोहोचल्यानंतर बकरीचा बळी दिला होता, त्यानंतर ते बकरीचे मांस घेऊन घरी पोहोचले. घरी येऊन त्याने त्या मांसाचे मटन बनवले आणि सर्व नातेवाईकांना बोलून जेऊ घातले.

पण त्याने बकऱ्याच्या डोक्याचा भाग न शिजवता तसाच स्वतःसाठी ठेवला. यादरम्यान त्याच्या दोन मित्रांसोबत दारू पिण्याचा बेत आखला आणि तिघेही दारू पिण्यासाठी सूरजपूरला पोहोचले. मद्य प्राशन केल्यानंतर असे काय घडल्याने मृताचे मित्रही हैराण झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दारू पार्टी केल्यानंतर तिन्ही मित्रांमध्ये बकऱ्याचे डोके शिजवण्याचे ठरवले. यादरम्यान मृताने बकऱ्याचा कच्चा डोळा खाण्याचा हट्ट धरला, त्यामुळे मित्रांनी त्याला तसे न करण्यास सांगितले. त्याच्या हट्टीपणामुळे बागरने शेळीचा डोळा बाहेर काढला आणि तो कच्चा खाण्यास सुरुवात केली. डोळा त्यांच्या घशात अडकला आणि श्वास घेता न आल्याने त्यांना प्राण गमवावे लागल्याचे सांगण्यात येत आहे.

बागर यांच्या गळ्यात शेळीचा डोळा अडकल्याचे त्यांच्या मित्रांनी सांगितले, त्यानंतर त्यांनी त्याला पाणी पिण्यास सांगितले, मात्र त्यांनी नकार दिला. श्वास नलिकेत डोळा अडकल्याने त्याला श्वास घेण्यास खूप त्रास होत होता. मित्रांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.