---Advertisement---

मॉरिसने अभिषेक घोसाळकरांवर गोळीबार का केला? अखेर पोलिसांनी सांगीतले खरे कारण

---Advertisement---

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर शुक्रवारी गोळीबार करण्यात आला होता. गोळीबारानंतर त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. यामुळे एकच खळबळ उडाली. सध्या पोलीस याबाबत तपास करत आहेत.

अभिषेक घोसाळकर यांच्यावर मॉरिस नोरोन्हा याने गोळीबार केला. हल्ल्यानतंर मॉरिसने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्याही केली. आता याबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहेत. मॉरिस नोरोन्हा याने ज्या अंगरक्षाकाच्या पिस्तुलातून गोळीबार केला होता.

दरम्यान, पोलिसांनी मॉरिसची पत्नी सरीनाचा जबाब काल नोंदवला. त्यातून महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मॉरिस निवडणुकीची तयारी करत होता. त्यासाठी त्यानं महत्त्वाच्या पक्षांकडून तिकिट मिळतंय का याची चाचपणी केली. पण बलात्काराचा आरोप असल्याने कोणताही पक्ष त्याला तिकिट देण्यास तयार नव्हता.

बलात्कारासह मॉरिसवर आणखी दोन केसेस होत्या. मॉरिसच्या मनात अभिषेक यांच्याबद्दल राग होता. त्याला सूड घ्यायचा होता, अशी माहिती तिनं पोलिसांना दिली. अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस नोरोन्हा हे पूर्वीपासून एकमेकांना ओळखत असल्याची माहिती समोर येत आहे.

याबाबत पोलीस सखोल चौकशी करत आहेत. त्यांच्यात काही वैयक्तिक वाद झाले होते, असेही सांगितले जात आहे. नंतर ते मिटल्यानं ते एकत्र आले होते. अभिषेक यांना मॉरिसनं स्वतःच्या कार्यालयात बोलावलं आणि फेसबुक लाईव्हही केलं. त्यावेळी या दोघांनीही एकमेकांचं कौतुक केले.

असे असताना मात्र या धक्कादायक घटनेने सगळेच हादरले असून सध्या गोळीबाराच्या अनेक घटना समोर येत आहेत. याबाबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. याबाबत राजकारण पेटले आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---