---Advertisement---

‘त्यावेळी युवराज मेला असता तरी…’, वडील योगीराज सिंहांचं धक्कादायक वक्तव्य! म्हणाले, ‘रक्ताच्या उलट्या होताना…’

---Advertisement---

योगीराज सिंग यांनी त्यांच्या मुलाशी, भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग, 2011 च्या वर्ल्ड कपदरम्यान झालेल्या गंभीर चर्चेचा खुलासा केला आहे. भारताला 28 वर्षांनंतर एकदिवसीय वर्ल्ड कप जिंकवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या युवराजबद्दल योगीराज सिंग यांनी पहिल्यांदाच उघडपणे बोलले.

ते म्हणाले, “मी फोनवर युवराजला सांगितले होते की, जर तू कॅन्सरमुळे मरण पावला असता आणि भारताने वर्ल्ड कप जिंकला असता, तरी मी एक अभिमानी वडील राहिलो असतो. मला आजही तुझा फार अभिमान आहे.” ‘अनफिल्टर्ड बाय समधीश’ या शोमध्ये दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे व्यक्त केले.

योगीराज यांनी सांगितले की, रक्ताच्या उलट्या होत असतानाही युवराज खेळत राहावा, असे त्यांना वाटत होते. त्यांनी युवराजला धीर देत म्हटले होते, “काळजी करू नकोस, तू मरणार नाहीस. भारताला हा वर्ल्ड कप जिंकून दे.”

योगीराज सिंग यांनी प्रशिक्षणासाठी येणाऱ्या मुलांच्या पालकांना दिलासा देत, मुलांचा मृत्यू झाल्यास जबाबदारी स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, “पालकांना मी स्पष्टपणे सांगतो की, त्यांच्या मुलाचा मृत्यू झाल्यास ती गोष्ट माझ्या हातात नसेल.”

त्यांनी असेही सांगितले की, युवराजने आपल्या संपूर्ण क्षमतेचा उपयोग केला नाही, असे त्यांना वाटते. “जर युवराजने माझ्या मेहनतीचा 10 टक्के हिस्सा लावला असता, तर तो सर्वोत्तम क्रिकेटपटू झाला असता,” असे त्यांनी म्हटले.

आता 66 वर्षांचे असलेल्या योगीराज सिंग यांना अजून एकदा क्रिकेट खेळण्याची संधी मिळावी, अशी इच्छा आहे. “मला अजून एक आयुष्य हवे आहे. मला विव्हियन रिचर्ड्ससारखे खेळायचे आहे आणि कपिल देव हा एकमेव भारतीय क्रिकेटपटू आहे, ज्याचा मी मोठा चाहता आहे,” असे त्यांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---